कारगिल विजय दिवस मराठी माहिती निबंध भाषण शुभेच्छा | kargil vijay divas marathi mahiti nibandh bhashan shubhecha

आजच्या 26 जुलै कारगिल विजय दिवस या लेखात आपण कारगिल विजय दिवस मराठी माहिती,

कारगिल विजय दिवस मराठी माहिती निबंध भाषण शुभेच्छा
कारगिल विजय दिवस मराठी माहिती निबंध भाषण शुभेच्छा

कारगिल युद्ध | kargil yudha

 ही माहिती कारगिल विजय दिवस निबंध व मराठी माहिती लिहिताना फक्त मुद्दे न लिहिता para बनवा. 

 कारगिल विजय दिवस मराठी माहिती पाहत असताना ते कधी झाले हे पाहूया आज पासून २१ वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये  जे युद्ध झाले ते युद्ध कारगिल या ठिकाणी झाल्याने त्याला कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते.
 

कारगिल युद्धात कोणाचा विजय झाला kargil yudhat viajay 

 
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या  या युद्धामध्ये भारताने खूप चांगल्या पद्धतीने पाकिस्तानला पराभवाची माती चारली  होती. पाकिस्तानची  जी घमेंड होती  की आम्ही कशाही पद्धतीने भारताला टॉर्चर करू शकतो.ही भारताने या युद्धाच्या निमिताने उतरवली होती.  भारत हा शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायला  प्रत्येक वेळेला पुढाकार घेणारा देश आहे. शांततेच्या मार्गाने कोणत्याही गोष्टी सोडण्याच्या बाबतीमध्ये भारत प्राधान्य देताना दिसतो  पण पाकिस्तानच्या मार्फत जे 1999 साली कारगिल या ठिकाणी गैरकृत्य केले त्याला कडवा जवाब भारताने दिला तो म्हणजे कारगिल युद्धात. भारताने त्यांना चांगलंच प्रतिउत्तर दिलेलं होतं.या कारगिल युद्धात भारताला विजय मिळाला. 
 

भारताचे पहिल्यांदाच सडेतोड उत्तर bharatche pakistanla sdetod uttar 

 
 भारताने आज पर्यंत जेव्हा जेव्हा पाकिस्तानने भारतामध्ये सीमा रेषेवर हस्तक्षेप किंवा इतर बाबतीत देखील हस्तक्षेप  करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने आतंकवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला एकदम सडेतोड प्रतिउत्तर भारताच्या मार्फत देण्यात आलेले दिसत नाही मात्र  26 जुलै 1999 रोजी भारताने कारगिल या ठिकाणी मिळवलेला जो विजय आहे तो खरच आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर व अभिमानाची बाब आहे.कारण यावेळी भारताने पाकिस्तानला सडेतोंड उत्तर दिल्याचे दिसते. 
 

कारगिल युद्धाची सुरुवात कोणाकडून kargil yudhala konakdun suruvat  

 
  कारगिलच युद्ध कशा पद्धतीचं होते तर  एक म्हणजे या युद्धाची  सुरुवात जी होती पाकिस्तान मार्फतच करण्यात आलेली होती.
 

कारगिल ठिकाण कोठे आहे kargil kothe aahe 

 
 कारगिल हे ठिकाण आता  जम्मू मध्ये आहे पूर्वी जम्मू आणि कशमिर संयुक्त भगत ते होते सध्या काश्मीर पासून जम्मू  आता वेगळा  झालेला आहे. आता कारगिल जमूच्या भागांमध्ये आहे. कारगिल  जम्मूमधील एक जिल्हा आहे आणि pok च्या  भागांमध्येच आहे.
 

कारगिल मध्ये पाकिस्तानी कारवाया kargil v pakistani kaarvaya 

 
कारगिल  भागावर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानातून पाकिस्तानी आर्मी पाकिस्तानी आतंकवादी यांची ही संयुक्त मोहीम होती. कारगिलच्या भागांमध्ये या दोघाणी वरच्या दिशेने प्रवेश करून या भगवर कब्जा मिळवण्याचा डाव होता. 
 

कारगिल मधील पाकिस्तानी कारवायांची माहिती pakistani karvaya mahiti 

 
 पाकिस्तानी सैन्य आणि आतंकवादी मिळून हा भाग आपल्या ताब्यात असावा यासाठी एका मोहिमेणे वरच्या दिशेने कब्जा मिळवत येत होते.त्यांच्या या मनसूब्याची खबर एका मेंढपाळाच्या मार्फत इंडियन सैन्याना समजली त्यावेळी त्यावेळी इंडियन आर्मीच्या मार्फत  या  भागात लष्करी कारवाया करायला सुरुवात केली.
 

कारगिल लढाई भारतासाठी अवघड का? kargil bhartasathi avghd ladhai 

 
युद्ध अभ्यासक यांच्या मते ही भारतासाठी अवघड किंवा challenging लढाई होती.कारण का तर पाकिस्तानी फौजा या डोंगर रंगाच्या वरच्या दिशेला तर भारतीय सैन्य किंवा इंडियन आर्मी ही खालच्या दिशेला होती. परंतु भारतीय जवान यांनी हार न मानता कडा संघर्ष केला.थोडक्यात  पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ही जी लढाई होती ही लढाई एकदम सोयीस्कर होती. कारण वरून खाली मारा करणे लढणे अतिशय सोपे होते. पाकिस्तानी सैन्य अंदाजे 18000 फुटवरती होते तर खाली भारतीय सेना होती. ह्या लढाईच्या वेळी प्रचंड थंडी होती तापमान – 28 डिग्री सेल्सिअस होते.
 

भारत व पाकिस्तानी फौजा आमने  सामने -bhart pak fauja aamne samne  

 
3  मे 1999 रोजी पाकिस्ताननी सैन्य या भागात आले.एका मेंढ पाळा मार्फत ही माहिती भारतीय जवानांना कळल्यानंतर भारतीय सैन्यदल,हवाई दल यांच्या संयुक्त मोहिमेतून भारताने एक मिशन हाती घेतले ते म्हणजे मिशन विजय व भारतीय फौजा आणि पाकिस्तानी फौजा आमणे सामने आल्या  3 मे पासून  26 जुलै पर्यंत 1999 पर्यन्त  ही लढाई चालू होती. 26 जुलै या दिवशी पाकिस्तानी फौजांनी या भागातून पळ काढला म्हणून हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
 

कारगिल युद्धात भारत व पाकिस्तान यांची हानीkargil bharat v pakistan nuksan 

 
कारगिल युद्धात भारताच्या वतीने असा दावा केला गेला की,आमचे साधारण 500 जवान या युद्धात कामी आले.परंतु पाकिस्तानने असा दावा केला की या युद्धात आमच्यापेक्षा भरताचे जास्त सैन्य मारले गेले याबाबत एकवाक्यता दिसत नाही. परंतु पाकिस्तानचे साधारण 2700 च्या आसपास सैन्य मारले गेले असा भारताने दावा केला.     
 

कारगिल युद्धातील जाबाज अधिकारी  kargil jabaj adhikari 

 
कारगिल युद्धात भारताचे एक कप्तान  विक्रम बतरा  यांचे योगदान व रणनीती खरोखर जबरदस्त होती म्हणूनच पाकिस्तानी फौजानी नांगी टाकली.कारगिलच्या परिसरातील  सर्वात महत्त्वाचा जो एरिया  होता तो म्हणजे  कारगिल जिल्ह्यामधील टायगर ग्रुपचा परिसर.विक्रम बत्रा यांनी शौर्य दाखवले परंतु या युद्धात ते  शहीद झाले. पांडे या अधिकाऱ्याने देखील कडा लढा दिला.अशा अनेक पराक्रमी जवानांमुळे आपल्याला कारगिल विजय मिळाला 
.

कारगिल युद्ध कोणाच्या काळात झाले kargil ladhai bhartat satta konachi 

 
भारत पाकिस्तान यांच्यात कारगिल लढाई किंवा युद्ध झाले त्यावेळी भारताचे राष्ट्रपती के. आर. नारायण होते.तर  पाकिस्तानचे जे राष्ट्रपती होते मोहम्मद रफीक करार हे पाकिस्तानचे राष्ट्रपती होते.  ज्यावेळेला कारगिल युद्ध झालं त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. kargil vijay divas nibandh मध्ये ही माहिती लिहू शकता. 
 

कारगिल युद्धात भारताला मदत kargil yudhat bhartala madat 

 
कारगिल युद्धावेळी इस्राईल या देशाने द्रोण तंत्रज्ञान भारताला दिले त्यामुळे पहाडी भागात पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यात भारतीय जवान याना यश आले. इजराइलच्या मार्फत भारताला ड्रोन चा पुरवठा करण्यात आला.  या वेळेला अनेक उच्च क्षमतेच्या तोफा इसरायलने भारताला पुरवल्या.अशा प्रकारे कारगिल युद्धा वेळी इस्राईल भारताच्या मागे उभा राहून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले.  कारगिल विजय दिवस निबंध लिहिताना भारताला कोणी मदत केलीय हे लिहिताना ही मदत तुमच्या कामी येईल. 
या कारगिल विजय दिवस मराठी माहितीच्या आधारे तुम्ही कारगिल विजय दिवस निबंध देखील छानपणे लिहू शकता. म्हणजेच kargil eassy in marathi साठी वरील माहिती उपयोगाची आहे. 


कारगिल विजय दिवस भाषण kargil vijay divas marathi bhashan 

 कारगिल विजय मराठी भाषण संगत असताना या कारगिल युद्धातील ठळक बाबी थोडक्यात सांगा असे केले तर तुमचे karagil vijay divas मराठी speech in  marathi श्रोते मंडळी याना नक्की आवडेल चला तर मग  कारगिल विजय दिवस भाषण आपण त्याचा एक नमूना पाहूया 
 

कारगिल विजय दिवस भाषण 

अध्यक्ष ,महाशय!
                    इथे उपस्थित असलेले गुरुजन वर्ग तसेच माझे बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी कारगिल विजय दिवस याविषयी माझे दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही मन लाऊन एकावेत ही विनंती.
 माझ्या  विषयाला सुरुवात करण्याअगोदर, या कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना  सर्वप्रथम नमन करतो. तसेच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो.
कोणताही सण असो ,
घरापुढे सडासमार्जन होते,
अगदी तसेच  देशाच्या,
 जवानांवर बोलायचे म्हटले की ,
अंगामध्ये दहा हत्तींचे बळ येते.
 सैनिकांचे नाव जरी  घेतले तरी देश प्रेम काय असते ? अगदी डोळ्यासमोर उभे राहते. हे सैनिकच रात्रंदिवस जीवाचे रान करून आपल्या सीमांचे रक्षण करत असतात. म्हणूनच आपण आपल्या देशामध्ये,घरामध्ये सुख आणि समाधानाने राहतो.
 कधी कधी या सैनिकांना शत्रूशी सामना देखील करावा लागतो यात अनेक जवान शहीद देखील होतात. असाच एक कारगिल विजय दिवस मी आज आपणा पुढे मांडणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारगिल या ठिकाणी जी लढाई झाली ती लढाई कारगिल ची लढाई म्हणून ओळखली जाते. या लढाईमध्ये भारताने जो विजय संपादन केला तो विजय मिळवलेला  दिवस म्हणजे 26 जुलै 1999 होय. या दिवसाची आठवण म्हणून अखिल भारतभर हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो.
कारगिल दिवस केवळ भारतीय सैन्यांनी पाकिस्तानी सैनिकांना पराजित केले म्हणून त्याचा गौरव केला जातो असे नाही तर, अतिशय भयानक परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले म्हणून हा दिवस कारगिल विजय दिवस किंवा दिन  म्हणून साजरा केला जातो. या कारगिल युद्धामध्ये भारताचे जवळपास  500 जवान शहीद झाले. या शहिदांच्या कार्याचा गुणगौरव देखील या दिवशी केला जातो. देशभरामध्ये कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात. या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून या दिवसाला भारतामध्ये खूप मोठे स्थान आहे.
ज्यांच्या शौर्यापुढे निसर्गही झुकला,
ज्यांच्या जिद्दीपुढे अवघा हिमालय वाकला,
सैनिक भारत मातेचा न कधी डगमगला,
तो मायनस डिग्रीतही शत्रू वर वाऱ्यागत  तुटून पडला. 
 
या ओळीतून या शहिदांचा पराक्रम तुमच्या ध्यानात आलाच असेल. तर या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मी  एवढेच आवाहन करतो की, सर्वांनी या दिवशी या शहिदांना अभिवादन केले पाहिजे. त्याचबरोबर भारतीय सैन्यामध्ये असणाऱ्या सैनिकांना  YOU ARE GREATअसे संबोधले पाहिजे.  त्यांचे आत्मबल वाढवले पाहिजे,कारण सैनिक आहेत म्हणूनच आपल्याला सुखाची झोप आहे.  आजच्या या कारगिल विजय दिनाच्या भाषणाच्या निमित्ताने आपण जे माझे दोन शब्द शांतचित्ताने ऐकले त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
जय हिंद! जय भारत!

कारगिल विजय दिन शुभेच्छा संदेश kargil vijay din shubecha vishes quotes

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने अनेक जण एकमेकांना एसएमएस शुभेच्छा संदेश म्हणजेच vishesh kinva quotes देत असतात चला  तर असेच काही अनोखे शुभेच्छा संदेश मी आपणासाठी बनवले आहेत. ते कारगिल विजय दिवस मराठी माहिती निबंध भाषण शुभेच्छा संदेश इतराना पाठवून त्याना एक वेगळा अनुभव देऊया.
 आपण आपले मित्र नातेवाईक संदेश यांना देऊन त्यांना राष्ट्रभक्तीची जाणीव करून देऊ शकता चला तर मग कारगिल विजयी दिवसानिमित्त काही शुभेच्छा संदेश पाहूया.
1. मातृभूमीचे रक्षण,
हेच आमचे औक्षण.
 कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
2. कारगिल युद्धात शहीद झालेल्या,
 जवानांचे रक्त वाया नाही जाणार,
त्यांचे स्मरण आम्हाला,
 शेवटच्या श्वासापर्यंत राहणार,
कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
3. तिरंगा आकाश मे लहर रहा है,
व हवा के कारण नही,
हमारी जाबाज सैनिको के,
 बुलंद होसलो के कारण. 
कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
4. कारगिल विजयासाठी आमच्या सैनिकांनी केला त्याग,
आता जर आमच्या भारत देशाकडे वाकडी नजर टाकाल,
तर आमच्याही डोळ्यात असेल नुसता राग राग,
कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
5. जब तक सुरज चांद रहेंगे I
कारगिल मे लडे जवान तब तक याद रहेंगे I
कारगिल विजय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
6. ज्यांनी देशासाठी रक्त सांडले,
आपले घरदार त्यागले,
कारगिलमध्ये शत्रूशी जे झुंजले,
तयांचे नाम आज मुखी गाजले,
कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
असे हे छान छान कारगिल विजय दिन संदेश आपण आपले मित्र मैत्रीणी याना जरूर पाठवा . 
 
आमचा शाहिद विशेष लेख कारगिल विजय दिवस मराठी माहिती निबंध भाषण शुभेच्छा कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद ! 
 
FAQ काही प्रश्न 
 
1. कारगिल युद्ध कोणत्या दोन देशात झाले ?
कारगिल युद्ध भारत पाकिस्तान या दोन देशात झाले. 
 
2. कारगिल युद्धात विजय मिळाला तो दिवस सांगा ?
कारगिल युद्धात भारताला 26 जुलै 1999 साली विजय मिळाला. 
 
3. कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते?
कारगिल युद्ध 60 दिवस सुरू होते. 
 
4. कारगिल युद्ध झाले त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
कारगिल युद्ध झाले त्यावेळी अटळ बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. 
 
आमचे हे अजून वाचलेच नाहीत 
– 
 
 
 

Leave a Comment