महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी mhatma jyotibaa fule mahiti marathi

अखिल भारतवर्षात ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यातील ज्यांचे नाव अग्रणी म्हणून घ्यावे लागेल असे थोर समाजसुधारक,शिक्षण प्रवर्तक mhatma jyotibaa fule mahiti marathi यांची माहिती पाहूया.  स्त्री शिक्षणं,शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच ब्रह्मन्यवादी वृत्तीला  विरोध करून ज्यांनी  सत्यशोधक समाजाची स्थापना केली व  सामान्य माणसाची धर्म ,कर्मकांड,व्रत ,वैकल्ये  यांच्या नावाखली होणारी लूट थांबवली असे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा  ज्योतिबा फुले होय.तरआज आपण त्यांची माहिती या लेखात पाहणार आहोत. 

महात्मा फुले यांची माहिती
महात्मा फुले यांची माहिती

महात्मा फुले यांची कौटुंबिक माहिती | Kautumbik Mahiti 

   महात्मा फुले यांचा  त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगून या छोट्याश्या गावात झाला. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते.  वडील गोविंदराव व  त्यांच्या आईचे नाव चिमनाबाई होते तर पत्नी सावित्रीबाई  होत्या.आपणास माहीतच आहे की मुलींच्या शिक्षणासाठी या पती पत्नीने किती अपार कष्ठ  घेतले आहेत. 

महात्मा फुले यांचे शिक्षण व बालपण |Fule Yanche Balpan 

  महात्मा फुले यांची घरची परिस्थिति अतिशय बेताची होती. महात्मा फुले यांनी इंग्रजी शिक्षण घेतले व आपले माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेतून पूर्ण केले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा सावित्री बाई यांच्याशी विवाह झाला.लग्नानंतर देखील त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.त्यांना मलखांब व दांडपट्टा चालवण्याची कला अवगत होती. त्यांनी सुरू केलेल्या संमजसुधारणा चळवळीत त्याच्या अनेक मित्रांनी त्यांना मदत  केली. उच शिक्षण घेऊन बहुजन समाज हितासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले .म्हणून तर त्यांना महात्मा ही उपाधी दिली आहे.संत कबीर यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 

महात्मा ज्योतिबा फुले एक कार्य पुरुष |  Mahtamaa Fule Yanchi Karye 

   महात्मा फुले यांनी शैक्षणिक,सामाजिक,धर्मिक अश्या विविध क्षेत्रात कार्य केल्याचे आपणास दिसते. त्यांची कार्ये जाणून घेऊया.

1. शैक्षणिक कार्य | Shaikshnik Karya 

   महात्मा फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय  महत्त्वपूर्ण आहे. ब्रिटिश प्रशासन भारतातील शिक्षणाविषयी दक्ष नाही अशी टीका महात्मा फुले यांनी केली व ब्रिटीश प्रशासनाला याबाबत विचार करायला भाग पाडले.महात्मा फुले यांनी केवळ मुलींसाठी शाळा सुरू केल्या असे नव्हे तर दलित कुटुंबातील मुलांसाठी देखील त्यांनी शाळा सुरू केल्या. महात्मा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाडा याठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू केल्यानंतर या शाळेत अध्यापनाचे कामकाज कोण करणार? हा त्यांच्यापुढे सर्वात यक्षप्रश्न होता. त्यासाठी त्यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले व त्यांच्यावर मुलींना शिक्षण देण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी पार पाडत असताना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
सावित्रीबाई  शाळेत जात होत्या त्यावेळेस काही लोकांच्या मनात त्यांच्याविषयीची चीड निर्माण होत होती. भारतीय समाज हा परंपरेने ग्रासलेला आहे. या परंपरेला या स्त्री शिक्षणातून छेद जात आहेअसे वाटत होते. या भूमिकेतूनच शाळेत जात असताना त्यांच्यावर  चिखलफेक केली गेली. हा सर्व त्रास पाहून सावित्रीबाई खचत होत्या. त्यावेळी त्यांना आत्मबल देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. सांगण्याचा मुद्दा असा की आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया भरारी घेताना दिसत आहेत. देशाच्या विकासात हातभार लावत आहेत हे सर्व कोणामुळे झाले तर महात्मा फुले यांच्या मुळे म्हणून त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य ही भारतासाठी, अखिल स्त्री जातीच्या उद्धारासाठी मोलाची कामगिरी आहे.

2.  शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य | Shetkryansathi Kary

            या जगात काही व्यक्ती खूप आगळे वेगळे असतात यापैकीच एक महात्मा फुले होते. यांनी स्त्री शिक्षणाबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न देखील इंग्रज प्रशासनासमोर मांडले. त्यांनी आपल्या या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले .भांडवलदार वर्ग जी शेतकऱ्यांची पिळवणूक करत होता त्यांच्याविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आसूड उगारण्याचा चे काम महात्मा फुले यांनी केले. शेतकरीवर्ग मागास का आहे तर त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, नवनवीन योजनांविषयी त्यांना माहिती मिळत नाही असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले.

3. स्त्री सुधारणा विषयक कार्य | Strre Sudharnaa Vishayk Karay

   मुलींसाठी शाळा सुरू केल्या याचबरोबर महात्मा फुले यांनी त्या काळच्या समाजात असणाऱ्या सती प्रथा, बाल विवाह यांचादेखील विरोध केला. समाजात स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे असे प्रबोधन त्यांनी केले. केवळ लिंग आवरून स्त्री आणि पुरुष असा भेद करणे हे त्यांना मान्य नव्हते .समाजामध्ये मुलगी शिकली तर ती दोन घरांचा उद्धार कशी करते. याविषयी त्यांनी जनमानस तयार केले. लोकांना हळु शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे थोडक्यात काय स्त्री सुधारणा विषयक बहुआयामी कार्य महात्मा फुले यांनी केले.

4.सत्यशोधक समाजाची स्थापना | Satyshodhk Smajachi Sthapna

     महात्मा फुले यांनी सर्वसामान्य जनतेची धर्माच्या नावाखाली, कर्मकांडाच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी एक नवा विचार प्रवाह मांडला. तो म्हणजे सत्यशोधक समाज होणे. धर्मांध लोक त्याकाळी धर्माच्या नावाखाली, वृत्त वैकल्ये यांच्या नावाखाली सामान्य जनतेची, कष्टकरी शेतकरी जनतेची लूट करीत होते.ही लूट थांबविण्यासाठी या सत्यशोधक समाजाने विवाहाचे नवीन विधी यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक लूट होणार नाही अशी व्यवस्था केली.  महात्मा फुलेंच्या या निरीक्षणातून समाजाचा किती बारकाईने त्यांचा अभ्यास होता. याची कल्पना आपल्याला आल्याखेरीज राहत नाही.

5.एक थोर विचारवंत | Mhatma Fule Ek Vicharvant

महात्मा फुले यांनी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य तर केलेच पण त्याच जोडीला भारतातील शेतकरी,कामकरी,आदिवाशी यांचे प्रश्न यावर अभ्यास करून आपले विचार मांडले.शेतकरी वर्गासाठी ब्रिटिश सरकारने काय करावे?याची मांडणी त्यांनी केली. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी हा विचार त्याकाळी त्यांनी मांडला होता . आज आपण शिक्षण हक्क कायदा पाहतोय त्याची बीजे त्यांच्या या विचारात सापडताना दिसत आहेत.समाजातील काही लोक सामान्य लोकांची ग्रंथ प्रामाण्य देऊन लूट करतात याची मांडणी देखील त्यांनी केली. या विवेचनातून ते विचारवंत होते याची जाणीव होते.

6. साहित्यिक म्हणून योगदान | Sahitik Mhanun Yogdan

             महात्मा फुले यांनी आपले विचार आपल्या लेखणीच्या माध्यमातून पुस्तक रूपाने प्रकाशित केले व सर्वसामान्य जनतेला सजग करण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक पोवाडा  लिहिला. या पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज राजे होते त्याच बरोबर कष्टकरी जनत., शेतकरी यांच्यासाठी ते कसे  महान होते याची मांडणी या पोवाड्यातून केली. शेतकऱ्याचा असून या पुस्तकातून ब्रिटीश प्रशासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत याची जाणीव करून दिल.. ब्राह्मणाचे कसब या पुस्तकातून धर्मग्रंथांचा नावाखाली काही विशिष्ट वर्ग लोकांची धर्माच्या नावाखाली, व्रतवैकल्यांच्या नावाखाली कसे लूट करतात अशी मांडणी यांनी केली. दलित समाजाचे दुःख अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकातून मांडल. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकातून सत्यशोधक समाज व त्याचे कार्य यांची माहिती दिल. थोडक्यात साहित्यातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम महात्मा फुले यांनी केल.. महात्मा फुले थोर समाज सुधारक हो, त्याच बरोबर एक मान लेखकही होते, शेतीविषयक अभ्यासातून एक शेतीतज्ञ होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

                 या जगात अनेक महान व्यक्ती जन्माला येतात आणि आपल्या कार्याचा ठसा उठवत असतात. पण विविध क्षेत्रात आपल्या कार्याद्वारे ओळख निर्माण करणारे महात्मा फुले हे अतिशय अग्रणी नाव घ्यावे असे आहे.. समाज मागासलेला होता.शिक्षणाचा अभाव होता अशा काळात मोलाची कामगिरी करणारे महात्मा फुले यांच्याविषयी  बोलो तितके, लिहू तितके कमीच आहे. आज बोकाळलेल्या राजकीय रणधुमाळीत सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, तरुण वर्गाला, दलित वर्गाला, अन्यायग्रस्त स्त्री वर्गाला आजही त्या महान आत्म्याची म्हणजेच महात्मा फुले यांची गरज आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. चला तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जमेल तेवढे सामाजिक कार्य करूया  व दीनदलित जनतेला आधार देऊया.

आमचे इतर lekh

 
 
 

Leave a Comment